Thursday, 18 February 2016

निचरा

सनसनाटी बातम्यांनीं भरलेले मथळे,
जोराचे वाद, फिरणारे हात,
आंदोलने, मोर्चे , झेंडे, फलक,
घोषणा, सभा, भाषण, टाळ्या,
चप्पल, शाई, थप्पड़, कॅमेरे,
उपोषण, पाणि, लाठी, गोळी,
अभिव्यक्ति, अधिकार,
अस्मिता, अस्तित्व ,
समानता, सहिष्णुता,
अमुकवापसी, तमुकवापसी,
आतचे बगळे असले आहेत,
तेव्हचेसुद्धा तसले होते,
असले तसले सगळे पांढरे,
रंजन घ्या कांत घ्या,
राज्यशास्त्राची डिक्शनरी घ्या,
सगळे शब्द बदाबदा ओता,
शब्दांचा मस्त चिखल होतो,
चिखलाशेजारी दुपार असते,
दुपारी भूक लागते,
ताटाशेजारी झेंडे असतात,
झेण्डेवाल्यांचे मुखवटे असतात,
गाडीन चिरडणाऱ्याचे पंखे असतात,
भगवा, तांबडा, हिरवा, निळा, काळा, कधी पांढरा रंग असतात,
चिखल आणि झेण्डेवाल्यांवर-
विचार-बिचारसरणींची जाळी असतात,
इजम-बिजम ची नेटं असतात,
जेवण झाल्यावर acid rain असते,
कपाट, फायली, प्रिंटा,
खटखट,क्लिक,क्लोज,
1,2,3,4,
हेवेदावे,आतल्या गाठी,
रंगीत कागद,लाचार डोळे,
त्याच्यानंतर दलदल असते,
वाट्सअप,फेसबुक,चिवचिव,
मेसेज,कॉल,बॅटरी,मेमरी......

दलदली पलिकड़ असीम हिरवळ,
निर्मनुष्य शांतता,
थोड़ मृगजळ - थोड़ पाणि...

बिरबलाची खिचड़ी शिजली नव्हती,
पण आयुष्य स्वादिष्ट होण्यासाठी दुरच्याही शेकोटीची गरज आहे.